Ad will apear here
Next
औंध येथे तंबाखू निर्मूलन प्रशिक्षण व दंतचिकित्सा शिबिर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात आयोजन


औंध : येथील रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ७८व्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात तंबाखू निर्मूलन प्रशिक्षण व दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी अॅड. तानाजी चोंधे, निवृत्ती कलापुरे, डॉ. राहुल मनियार, डॉ. सुहासिनी सातपुते, कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्य डॉ. मंजुश्री बोबडे यांच्यासह डॉ. तानाजी हातेकर, प्रा. डी. एस. पाटील, प्रा. प्रदीप भिसे, प्रा. सायली गोसावी, प्रा. कुशल पाखले, प्रा. मयुर माळी उपस्थित होते.

या वेळी मार्गदर्शन करताना डॉ. मणियार म्हणाले, ‘सुरुवातीच्या काळात दक्षिण अमेरिकेत तंबाखूचे अस्तित्व दिसून आले. त्यानंतर त्याचा जगभरात झपाट्याने प्रचार आणि प्रसार झाला. कष्टकरी व कामगारांमध्ये तंबाखूच्या सेवनाचे प्रमाण सर्वाधिक आहे. तंबाखूमधील निकोटीन या विषारी पदार्थामुळे माणसाला त्याची सवय लागते. तंबाखूमध्ये चार हजारांहून अधिक विषारी रसायने आहेत. भारतामध्ये साधारणपणे चौदा कोटी पुरुष आणि चार कोटी महिला तंबाखूचे नियमित सेवन करताना दिसतात. भारतात वर्षभरात ४३ लाख किलो तंबाखूचे सेवन केले जाते. भारतामध्ये प्रत्येक वर्षी वीस हजार कोटींच्या तंबाखूची विक्री केली जाते. तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांवर भारत सरकारद्वारे मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. तंबाखूमुळे तोंड, स्वरयंत्र, श्वासनलिका, मूत्रपिंड, गर्भाशय, मुखाचा कॅन्सर होतो. केसांना व तोंडाला दुर्गंधी येते. दात पडतात, हिरड्यांना इजा होऊन दातांवर चॉकलेटी पिवळे डाग पडतात. नाकाची वास घेण्याची क्षमता कमी होते. अकाली वृद्धत्व येते. चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. हाडे ठिसूळ होतात. त्यामुळे तंबाखूचे सेवन करू नये.’



तंबाखू खाणे सोडल्यास माणसाचे जीवनमान सुधारण्याबरोबरच शारीरिक क्षमताही वाढेल. आत्मविश्वास वाढून आरोग्यवृद्धी होईल. समाज आणि कुटुंबाचे आरोग्यही सुधारेल. यासाठीच व्यसन न करण्याचा प्रचार आणि प्रसार समाजात करणे गरजेचे असल्याचे डॉ. मणियार यांनी नमूद केले.

प्राचार्या डॉ. बोबडे म्हणाल्या, ‘कोणतेही व्यसन हे स्वतःसाठी आणि समाजहिताच्यादृष्टीने घातकच असते. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून प्रतिज्ञा करायला हवी की,  मी व्यसन करणार नाही आणि समाजातील व्यक्तींना व्यसन करू देणार नाही, तरच निरोगी समाजाची निर्मिती होऊ शकेल. आनंदी आणि भरभरून जीवन जगण्यासाठी सर्वांनी व्यसनांपासून दूर राहावे.’

उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ यांनी प्रास्ताविक केले. प्रा. भक्ती पाटील यांनी आभार मानले. ‘आयक्यूएसी’ कमिटी चेअरमन डॉ. सविता पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZRABV
Similar Posts
औंध महाविद्यालयात शोधनिबंध कार्यशाळा औंध : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी कृषीमंत्री शरदचंद्र पवार यांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त पोस्टर सादरीकरण व शोधनिबंध कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. विज्ञान परिषदेमार्फत पश्चिम विभागातील सर्व शिक्षकांसाठी ही कार्यशाळा घेण्यात आली.
‘रयत शिक्षण संस्थेमुळे जीवनाचे सोने झाले’ औंध : ‘कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाचे सोने झाले. मी ही त्यातील एक विद्यार्थी असून, माझ्यासारखे हजारो विद्यार्थी झोपडपट्टी परिसरातून शिक्षणासाठी येत होते; मात्र त्यांना प्रतिष्ठित महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता. अशा वेळेस डॉ. आंबेडकर महाविद्यालयाने
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ औंध : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ उत्साहात पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भगीरथ शिंदे, रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष अॅड. राम कांडगे उपस्थित होते.
पुणे विद्यापीठातील सदस्यांची डॉ. आंबेडकर कॉलेजला भेट औंध : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाच्या नवनियुक्त अभ्यास मंडळ सदस्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाला आठ ऑगस्ट रोजी भेट दिली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language